मंगळवार, ३० सप्टेंबर, २०१४

KING 20

२०


राजैव कर्ता भूतानां राजैव च विनाशक: ।
धर्मात्मा यः स कर्ता स्यादधर्मात्मा विनाशक: ॥
-महाभारत़

प्राण्यांचे कल्याण करणारा राजाच आणि त्याचा नाश करणाराहि पण राजाच़ कारण.तो धर्माने वागेल तर कल्याणकर्ता आणि अधर्माने वागेल तर नाश करणारा ठरतो़
-महाभारत़

राजा हा दुधारी शस्त्रा प्रमाणे काम करु शकतो़ तो सर्व प्राणीमात्रांचा कल्याणकर्ता वा नाशकर्ता असू शकतो़ अणू बाँबचे परीणाम जगाने अनुभवले आहेत़ राजधर्माचे पालन करु शकणारा राजा निवडणे हाच त्यावरील उपाय व विवेक समजावा़
--प्रशिप


सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

KING 19

१९


राजानं प्रथमं विन्देत्ततो भार्या ततो धनम्‌ ।
राजन्यसति लोकंस्य कुतो भार्या कुतो धनम्‌ ॥
-महाभारत़

प्रथमतः (संरक्षण करणारा) राजा प्राप्त करुन घ्यावा त्यानंतर भार्या मिळवावी व द्रव्य मिळवावे़ कारण राजाच अयोग्य असेल तर स्त्री तशी कशी राहणार व धन तरी कसे मिळणार ?
-महाभारत़. 

सुखी संसाराच्या कल्पनेत चांगली स्त्री मिळावी, भरपूर धन प्राप्ती व्हावी,असे वाटणे स्वाभाविक आहे़ परंतू या सुखाच संरक्षण कोण करणार? तसे करणारा तो केवळ योग्यतेचा राजाच असू शकतो़ म्हणून अगोदर चांगला 'चारीत्र्यसम्पन्न'  राजा निवडला गेला पाहिजे याची काळजी घेणे आवश्यकं आहे़
-प्रशिप. 


रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

KING 18

१८


राजमूलो महाप्राज्ञ धर्मो लोकस्य लक्ष्यते ।
प्रजा राजभयादेव न खादन्ति परस्परम्‌ ॥
                                           -महाभारत़

(बृहस्पति वसुमना राजाला सांगतात) लोक धर्माने वागतात,याचे कारण राजाच होय असे दिसून येते़ राजाच्या भीतीमुळेच लोक एकमेकांना खाऊन टाकीत नाहीत़
-महाभारत़. 

देशातील प्रत्येकं नागरीकाला निर्भयपणे जगता आले पाहिजे, फिरता आले पाहिजे हाच याचा अर्थ आहे़. या साठीच राजाने कायदा केलेला असतो़ त्यामुळेच समाज व्यवस्था टिकून राहते़ त्याचे कारण राज्यकर्ताच असतो़.  म्हणून असुरक्षितता यासाठी सरकारला जबाबदार धरले जाते़
-प्रशिप


शनिवार, २७ सप्टेंबर, २०१४

KING 17

१७


राजमूला महाबाहो योगक्षेमसुवृष्टयः ।
प्रजासु व्याधयश्चैव मरणं च भयानि च ॥
-महाभारत़

(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात) प्रजेचा योगक्षेम नीट चालणे, पर्जन्य चांगला पडणे, तसेच प्रजेला रोग, मरण अथवा भय  प्राप्त होणे या सर्वांचे मुख्य कारण राजाच आहे़. 
-महाभारत़. 

सार्वजनीक आरोग्याची जबाबदारी राज्यकर्त्यावर असते़ अनैसर्गिक मृत्यू, अपहरण, यांची जबाबदारी राज्यकंर्त्यावर आपण ठेवतोच़ पर्जन्य चांगला होण्यासाठी राजाच कारण आहे यावर कदाचित मतभेद होतील, परंतु आत्ताच्या दुष्काळाला  सरकार जबाबदार आहे असे म्हटले गेले़, येथपर्यंत विचार आला आहे ही बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे़
-प्रशिप


शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

KING 16

१6
राजा कृतयुगस्रष्टा त्रेताया द्वापरस्य च ।
युगस्य च चतुर्थस्य राजा भवति कारणम्‌ ॥
-महाभारत़. 

जगात कृतयुग उत्पन्न करणारा राजाच होय़. तीच गोष्ट त्रेता युगाची आणि द्वापार युगाची आणि चौथ्या म्हणजे कलियुगालाहि राजाच कारण असतो़
-महाभारत़. 

कृतयुग इ़ ही गुणांवर आणि कर्मावर आधारीत एकप्रकारची कालगणनाच आहे़ सामाजीक जीवनाची स्थिती त्यातून व्यक्त केली जाते़.  या सर्व काळातील चांगल्या आणि वाईट परंपरा, घटना या सर्वांना राजाच कारण असतो असे म्हटले आहे़ म्हणूनच राजाची निवड करतांना जनतेने व्यापक विचार करणे आवश्यक आहे़. 
-प्रशिप


KING 15

१५
 युक्त्ता यदा जनपदा भिक्षन्ते ब्राह्मणा इव ।
अभीक्ष्णं भिक्षुरुपेण राजानं घ्नन्ति तादृशाः ॥
 -महाभारत़

राष्ट्रातील प्रजा उद्योगशील असूनहि जर भिक्षुरुपी बनून ब्राह्मणाप्रमाणे वारंवार भिक्षा मागू लागली तर तिच्या योगाने राजाचा वध होतो़
-महाभारत़

ब्राह्मण हा अपरीग्रह (संचय न करणे) करणारा असतो/होता़ म्हणून त्याला भिक्षा दणे आवश्यक होते़ कर्ज माफ करण्याची पद्धत पुन्हा पुन्हा केली आणि तशी सवयच जनतेला झाली तर राजाचा वध होऊ शकंतो़ पराभव होऊ शकंतो़
--प्रशिप

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

KING 14

१४


यादृशो जायते राजा
तादृशोजस्य जनो भवेत्‌ ॥
                                        -महाभारत़

जसा राजा असेल तशी त्याची प्रजा होते़
                                          -महाभारत़

संस्कारांनी राजाच्या वर्तनुकीचा परीणाम जनतेवर होतो़. ज्या वेळी मुखातून, आमचे नेतेच भ्रष्ट आहेत तर आम्ही भ्रष्टाचार केला तर काय बिघडले? असे बाहेर पडत असेल तर तो वरील बाबीचाच परीपाक म्हणावा लागतो़. 
-प्रशिप


KING 13

१३

क्षत्रियस्य महाराज जये वृत्ति समाहिता ।
स वै धर्मस्त्वधर्मो वा स्ववत्तौ कंा परीक्षणा ॥
-महाभारत़

(दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणतो) हे महाराजा, युद्धात जय मिळविणे हा क्षत्रियाचा व्यवसाय ठरलेला आहे, मग त्यात धर्र्म असो किंवा अधर्म असो़ स्वतःच्या व्यवसायाची चिकिंत्सा कंरुन कंाय फायदा ?
                                            -महाभारत़

युद्ध बहूदा राजपदासाठी असत़ निवडनूकंाहि राजपदासाठीच असतात़ युद्धात जय मिळवणे याला व्यवसाय म्हटले आहे, आज निवडनूकंाहि व्यवसाय झाला आहे़ व्यवसायात धर्म अधर्म पाहिला जात नाही़ आज तोच विचार केला जातो़ परंतू वरील विचार दुर्योधनाचा आहे, खलनायकंाचा आहे, धृतराष्ट्राचा नाही हे लक्षात घेतले पाहिजे़ दुर्योधन त्याच वैभव नष्ट कंरणारा धनी आहे़
                                                     -प्रशिप


बुधवार, २४ सप्टेंबर, २०१४

KING -12

१२

यद्यदाचरते राजा तत्प्रजानां स्म रोचते ।
                                      -महाभारत़

राजा जे जे कंरतो ते प्रजेला आवडू लागते़
                                           -महाभारत़

सामान्य जनता उच्च तत्व विचारापासून लांब राहते़ त्यामुळे ती अनुकंरणासाठी आपल्या राजावर किंवा नेत्यावर अवलंबून असते,विसंबून राहते़ म्हणून त्या नेत्याने केलेली कृति ती योग्यच असेल असे माणून तो ती आवडीने स्विकारतो किंवा होयबा' वा लालसा म्हणून स्विकारतो यामुळे राजाने वा नेत्याने केलेल्या चुकीच्या गोष्टींचे समर्थन कंरणा-यांचीही चढाओढ लागते़ हे आपण नेहमीच अनुभवतो़. 
--प्रशिप


मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

KING 11

11

यदा मधु समादत्ते  रक्षन्पुष्पाणि षट्पद : |
तद्वर्थान्मनुष्येभ्य  आददध्यादविहिन्सया  ||
--महाभारत. 

भ्रमर जसा फुलांना अपाय न करता त्यातील मध तेवढा काढून घेतो. त्या प्रमाणे लोकाचे मन न दुखावाता  त्यांचे पासून द्रव्य घ्यावे. 
--महाभारत 

राजाने देशासाठी कर घेणे आवश्यक आहे यात शंका नाही . त्या कराचा 'प्रमाण ' आणि  'देशासाठी'  हे शब्द महत्वाचे  आहेत. कर घेणे हे शोषण होता कामा नये आणि करदात्याला शारीरिक वा मानसिक अपाय होता कामा नये. अशा राजाची आवश्यकता असते. 
--प्रशिप 

सोमवार, २२ सप्टेंबर, २०१४

KING 10

१०

मधुदोहं दुहेराष्ट्रं भ्रमरा इव पादपम्  |
वत्सापेक्षी दुहेच्चैव स्तनान्श्च् न विकुट्ट्येत्  ||
--महाभारत .

भ्रमर जसा झाडावरील फुलाला धक्का न लावता त्या मधिल मध तेवढा हळूच काढून घेतो त्या प्रमाणे राजाने प्रजेचे मन न दुखावता तिजपासून कराच्या रूपाने द्रव्य ग्रहण करावे. अथवा, ज्या प्रमाणे गाइची धार काढणारा वासराला दुध राहील अशा बेताने धार काढतो , आचल अगदी पिळून कढत नाही. या प्रमाणे राजाने प्रजेचे पोषण होईल अशा बेतानेच कर घ्यावा 
--महाभारत. 


नियमितपणे वाढत जाणाऱ्या कराबद्दल लोक आक्रोश करतच असतात. 
राज्यकर्ते नाइलाजाने करवाढ केली असे समर्थन करत असतात. परंतु परदेशातील काळा पैसा, राज्यकर्त्यांकडे असलेली बेहिशोबी संपत्ती  राजाकाराभारात  आणल्यास वरील बाबींची काळजी न करता  अनेक वर्ष कर सुद्धा घ्यावा लागणार नहि. 
--प्रशिप 

रविवार, २१ सप्टेंबर, २०१४

KING 9



प्रीयते हि हरन्पाप: परवित्तमराजके ।
यादास्य उद्धरन्त्येन्ये तदा राजामिच्छति ।।
--महाभारत 

दुसऱ्याचे द्रव्य हरण करणाऱ्या पापी मनुष्याला देशात राजा नसलेला बरा वाटतो, पण जेंव्हा त्याचे द्रव्य दुसरे लोक नेऊ लागतात  तेंव्हा त्याला राजा असावा असे वाटू लागते.  
--महाभारत . 

गुन्हेगाराला शासन किंवा शासकीय यंत्रणा नकोशी होणे स्वाभाविक आहे. 
तथापि गुन्हेगारासाठीच राज्यकर्ते मदत करू लागले किंवा राज्यकर्तेच गुन्हेगारी पार्श्वभूमिचे निवडले गेले तर रडण्यापेक्षा तत्व अनुसरणे आवश्यक आहे. 
--प्रशिप

शनिवार, २० सप्टेंबर, २०१४

KING 8



प्रजा यस्य विवर्धन्ते सरसीव महोत्पलम ।
स सर्वफलभाग्राजा स्वर्गलोके महीयते  ।।
--महाभारत 

ज्या राजाच्या प्रजा सरोवरातील कमलाप्रमाणे वृद्धिंगत होत असतात , त्याला सर्व प्रकारची फळे प्राप्त होतात , व तो स्वर्गामध्ये पूज्य  होतो. 
--महाभारत 

स्वर्गाची कल्पना सर्वच मान्य करतील असे 
पण आपण ह्या जगतात पूजनीय व्हावे असं बहुसंख्य राज्यकर्त्यांना वाटू शकत. इतरांना वैभवशाली केल्यानंतर आपण वैभवशाली होत असतो. हे आमच्या राज्यकर्त्यांनी ध्यानात घ्यायला हवं. आपण मोठे होण्यासाठी इतरांना लहान करणे किंवा ठेवणे हे तत्व म्हणून स्विकारले गेलेले नाही . 
--प्रशिप .   

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

KING 7



पुत्रा इव पितुर्गेहे विषये यस्य मानवा: |
निर्भया विचरिष्यन्ति स राजा राजसत्तम: ||
--.महाभारत .

बापाच्या घरात जसे मुलगे , तसे ज्याच्या राज्यात लोक निर्भयपणे संचार करु शकतात ,  तो राजा सर्व राजात श्रेष्ठ होय .
--महाभारत. 

जीवन जगतान्ना निर्भयता कशी असावी या बद्दलचे या पेक्षा अधिक चाङ्गले उदाहरण दुसरे नाही .राज्याला घराची उपमा दिली आहे. राजा हा त्या घराचा पालक आहे. आपल्या राज्यात किङ्वा आपल्याच आपल्याच घरात आपण असुरक्षित असु तर आपल्या राजाला आपले श्रेष्ठत्व सिध्द करावयास वाव आहे. 
--प्रशिप .


गुरुवार, १८ सप्टेंबर, २०१४

KING - 6


६ 

नित्योद्विग्ना: प्रजा  यस्य  कारभार प्रपीदिता  ।
अनर्थैर्विप्रलुप्यन्ते  स गच्छति पराभवम्  ||
--महाभारत .

ज्या राजाच्या प्रजा नेहमी भयभीत  आहेत करांच्या ओझ्यामुळे चिरडून गेल्या आहेत , अनेक संकटांनी लुटल्या जात आहेत त्या राजाचा पराभव होतो. 
--महाभारत . 

निर्भयतेने जगण्याचा अधिकार आम्हाला रजघटणेने दिला पण आम्ही खरोखरच सुरक्षित आहोत का? देशातील  नागरीक जो कर भरतो तो वाजवी आहे काय ? आणि आपत्तीच्या काळी उदा: अपघातात ,आजारपणात सरकारी दरबारी तातडीचे काम असता ,अन्याय  असता इ. संकटात आपणास सहाय्य मिळते की आपण लुटले जात आहोत असे वाटते ?याचे उत्तर हो असेल तर राज्यकर्त्यांचा पराभव करण्याचा आपल्याला अधिकार आहे. 
--प्रशिप . 


बुधवार, १७ सप्टेंबर, २०१४

KING 5

५ 

धिक्तस्य जीवितम् राज्ञो राष्ट्रं यस्यावसीदति  |
अवृत्त्यान्यमनुष्योs पि यो वैदेशिक इत्यपि ||
--महाभारत 

ज्याचे  राष्ट्र क्षीण  दशेप्रत पावते आणि परदेशात रहाणाऱ्या अन्य मनुष्यही ज्याच्या राष्ट्रात उपजीविका न झाल्याने नाश पावतो त्या राजाच्या  जीविताचा धिक्कार असो. 
--महाभारत. 

ह्या ठिकाणी राज्याच्याच अपात्रतेचा   नव्हे   तर  त्याच्या धिक्काराच्या  दोन  सांगितल्या आहेत.  ज्या राजाचा देश दुर्बल होता होत चालला आहे त्या राजाचा धिक्कार सांगितला आहे. या शिवाय  पर रज्यातून आलेला तथापि उपजीविका न झाल्याने नाश पावत  असेल तरीही  तो  धिक्करास पात्र होतो. 
--प्रशिप 

मंगळवार, १६ सप्टेंबर, २०१४

KING -4


धर्मे तिष्ठन्ति भूतानि धर्मो राजनि तिष्ठन्ति |
तं राजा साधु य: शास्ति स राजा पर्थ्विपति  ||
--महाभारत.

धर्माच्या आधाराने प्राणी राहतात. धर्म राजाच्या आधाराने राहतो, त्या धर्माचे पालन जो राजा उत्तम प्रकारे करतो तो राजा सर्व पृथ्वीचा स्वामी होतो. 
--महाभारत 

केवल नगरातील विभागाचा स्वामी होण्याची महत्वकाङ्क्षा न धरता जगाचा स्वामी होण्याची इच्छा धरावी यात वावगे काहिच नाही. सर्व  निर्भयपणे जगले पहीजेत. त्यासाठी जीवन्षैली व कर्तव्य असतात. त्यालाच धर्म म्हणतात. म्हणून् प्राणी धर्माच्या आधाराने जगू शकतात. तो धर्म ती जीवनशैली चान्गल्या रजाक्डूनच पालली जाउ शकते. याच ज्ञान आणि भान असणारे स्वामी होण्याची इच्छा धरु शकतात.
--प्रशिप .







सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

KING -3

3

धर्माय राजा भवति न कामकरणाय तु  ॥ 
--महाभारत 

धर्म रक्षणासाठी  उतपत्ति आहे. आपल्या इच्छा तृप्त करून   घेण्यासाठी नव्हे. 
--महाभारत 

धर्म म्हणजे कर्त्तव्य. राजासाठी तोच राजधर्म असतो त्यासाठी राजा  जातो . जगाच्या पाठीवर अनेक राज्यकर्ते आपल्या इच्छा पूर्ण  करण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करतत. हे  आपण केवळ उघड्या डोळ्यांनी पाहू  नये . 
--प्रशिप 

शनिवार, १३ सप्टेंबर, २०१४

KING -2

२  
दण्डनीत्याम यदा राजा सम्यक्कार्त्स्न्येन वर्तते  ।
तदा कृतयुग नाम कालसृष्ट  प्रवर्तते  ।।
--महाभारत . 

जेंव्हा राजा योग्य रीतीने आणि पूर्णपणे दण्डनितिच्या अनुरोधाने चालतो , तेंव्हा कालनिर्मित  अशा कृतयुगाची प्रवृत्ति होते. 
-- महाभारत 

कृतयुग हे आदर्श युग आहे. त्याकडे जायचे असेल तर देशाचा राजा कर्तव्याने आणि गुन्हेगाराला शिक्षा करण्याचे सामर्थ्य असलेला निवडला  पाहिजे . गुन्हेगार मोकाट फिरत असतील किंव्हा गुन्हेगारच राज्यकर्ता होऊ पहात असेल तर त्याचा दोष त्याला निवडून  देणारे जे असतात त्यांचाही असतो. 
--प्रशिप. 

KING. 1

1  

किं तस्य तपसा  राज्ञ :किञ्च् :तस्याध्वरैरपि |
सुपालितप्रजो य: स्यात् सर्वधर्मविदेव स:||

                                                      - महाभारत 

जो राजा प्रजेचे उत्तम पालन करतो तो सर्व धर्म जाणणाराच  होय . अशा राजाला  तप काय करावयाचे ? यज्ञाची काय गरज ?
                                                                                 -महाभारत 

भारतीय संस्कृतीत तप आणि यज्ञाला अतिशय महत्व दिले आहे. ह्या ठिकाणी यज्ञ आणि तपाची तुलना प्रजेच्या उत्तम पालनाशी  केली आहे . याचा अर्थ एवढाच की प्रजेचे पालन करणे हाच राजाचा केवळ धर्म आहे . 
                                                                                     -प्रशिप 

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०१४

KING

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका  जाहीर झाल्या आहेत. आपल्याला आपला राजा निवडून ध्यायचा आहे. भारतीय  संस्कृतीतील   रामायण आणि महाभारतात राजा कसा असावा या बद्दल उत्तम  संदर्भ दिले आहेत . त्यतील काही संदर्भ    रोज निवडणूक होई पर्यंत आपण पाहू