३२
स तु
श्रेष्ठैर्गुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः ।
बहिश्चर इव
प्राणो बभूव गुणतः प्रियः ॥
-रामायण़.
उत्कृष्ट
गुणांनी संपन्न असलेला तो राजकुमार राम आंगच्या
गुणामुळे प्रजाजनांना शरीराबाहेर संचार करणारा प्राणच की काय असा प्रिय झाला़.
--रामायण़.
आईला आपला
मुलगा आपल्या शरीरा बाहेर असलेला आपला प्राण आहे असे वाटणे स्वाभाविक आहे़. या
पेक्षा अधिक घट्ट नाते असू शकत नाही़. असे नाते प्रजाजनांना राजपुत्र रामाबद्दल
वाटावे ही राजा आणि प्रजा यातील परमोच्च अवस्था आहे़ म्हणूनच आदर्श राज्याला रामराज्याचा
दर्जा प्राप्त होतो़. राजाच्या मुलाचा वर्तनाचा दाखला जनतेने दिला पाहिजे. राजाने देता कामा नये.
-प्रशिप