बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

KING 28

२८


क्षममाणं नृपं नित्यं नीचः परिभवेज्जनः ।
हस्तियन्ता गजस्येव शिर एवारुरुक्षति ॥
-महाभारत़

राजा सदैव अपराधाची क्षमा मागू लागला, म्हणजे निकृष्ट प्रतीचे लोकसुद्धा  त्याची अवज्ञा करु लागतात़. हत्तीच्या मस्तकावर आरोहण करणा-या माहूताप्रमाणे ते त्याच्या डोक्यावर बसण्याची इच्छा करु लागतात. 
--महाभारत़

राजा ज्ञानी आणि तत्ववेत्ता असावा तो याच साठी़ राजा कडून खरे म्हणजे चूकाच होउ नयेत़ म्हणजे त्याला क्षमा मागायची वेळ येता कामा नये़ लोकप्रतिनिधी निवडतांना नेहमी चूका  करुन क्षमा मागणारा निवडता कामा नये़ अन्यथा ती आपली चूक ठरेल आणि ह्या चुकांना  क्षमा नाही़. 
  -प्रशिप.