शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

KING 31

३१

सक्तं ग्राम्येषु भोगेषु कामवृत्तं महीपतिम्‌ ।
लुब्धं न बहु मन्यन्ते श्मशानाग्निमिव प्रजाः ॥
-रामायण़. 

जो राजा लोभी, ग्राम्य विषयांचे ठिकाणी आसक्त होणारा आणि मनास येइल तसे वर्तन करणारा असतो, त्याचा स्मशानातील अग्नीप्रमाणे  लोक तिरस्कार करतात़. 
-रामायण़. 

लोभ आणि काम आसक्ती या दोन गोष्टींच्या आहारी गेलेली व्यक्ती नाश पावते़ कारण त्यासाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते, त्यातून प्रमादच घडतात़ हिच बाब राजाचे बाबतीत घडली तर त्याचेसह राष्ट्र नाश पावते़ अशा राजाचा तिरस्कार  झाला नाही तरच नवल़.  जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत़. चारित्र्य संपन्न राजा हेच राज्याचे वैभव असते. 

--प्रशिप