शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

KING 16

१6
राजा कृतयुगस्रष्टा त्रेताया द्वापरस्य च ।
युगस्य च चतुर्थस्य राजा भवति कारणम्‌ ॥
-महाभारत़. 

जगात कृतयुग उत्पन्न करणारा राजाच होय़. तीच गोष्ट त्रेता युगाची आणि द्वापार युगाची आणि चौथ्या म्हणजे कलियुगालाहि राजाच कारण असतो़
-महाभारत़. 

कृतयुग इ़ ही गुणांवर आणि कर्मावर आधारीत एकप्रकारची कालगणनाच आहे़ सामाजीक जीवनाची स्थिती त्यातून व्यक्त केली जाते़.  या सर्व काळातील चांगल्या आणि वाईट परंपरा, घटना या सर्वांना राजाच कारण असतो असे म्हटले आहे़ म्हणूनच राजाची निवड करतांना जनतेने व्यापक विचार करणे आवश्यक आहे़. 
-प्रशिप


KING 15

१५
 युक्त्ता यदा जनपदा भिक्षन्ते ब्राह्मणा इव ।
अभीक्ष्णं भिक्षुरुपेण राजानं घ्नन्ति तादृशाः ॥
 -महाभारत़

राष्ट्रातील प्रजा उद्योगशील असूनहि जर भिक्षुरुपी बनून ब्राह्मणाप्रमाणे वारंवार भिक्षा मागू लागली तर तिच्या योगाने राजाचा वध होतो़
-महाभारत़

ब्राह्मण हा अपरीग्रह (संचय न करणे) करणारा असतो/होता़ म्हणून त्याला भिक्षा दणे आवश्यक होते़ कर्ज माफ करण्याची पद्धत पुन्हा पुन्हा केली आणि तशी सवयच जनतेला झाली तर राजाचा वध होऊ शकंतो़ पराभव होऊ शकंतो़
--प्रशिप