मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४

KING 34

३४


परस्य वीर्यं स्वबलं च बुद्ध्‌वा
स्थानं क्षयं चैव तथेव वृद्धिम्‌ ।
तथा स्वपेक्षेजप्यनुमृश्य बुद्ध्‌या
वदेत्क्षमं स्वामिहितं स मन्त्री ॥
                                  -रामायण़

जो पुरुष शत्रूचे आणि आपले बल जाणतो, शत्रूच्या आणि आपल्या सैन्याची स्थिति, वृद्धि आणि क्षय ह्यांचा बुद्धिपूर्वक विचार करतो, धन्याचे हित कशात आहे ते योग्य रीतीने त्याला सांगतो, तोच खरा मंत्री होय़. 
--रामायण़

मंत्रिमंडळातून फुटून आपला गट किंवा सत्ता स्थापण्याचे अनेक प्रसंग आपण पाहिले आहेत़.  आपल्या प्रमुखाला केवळ सत्य सांगण्याचे धाडस किंती मंत्र्यांमधे असलेले आपण अनुभवले आहे मला झाडू मारायला सांगितला तरी मी मारीन असे म्हटलेलेहि आपण पाहतो.  धन्याचे हित म्हणजे राष्ट्राचे हित असावे़. राजाचे मन्त्री होयबा नसावेत.  

-प्रशिप

सोमवार, १३ ऑक्टोबर, २०१४

KING 33

३३


अनभिज्ञाय शास्त्रार्थान्‌ पुरुषाः पशुबुद्धयः ।
प्रागल्भ्याद्वक्तुमिचछन्ति मन्त्रिष्वभ्यन्तरीकृताः ॥
-रामायण़. 

मंत्रिजनांमध्ये समाविष्ट केलेले मूर्ख पुरुष शास्त्रार्थ समजत नसतांही आपल्या आंगच्या बोलकेपणाच्या जोरावर शास्त्रार्थाच्या गोष्टी सांगू इच्छितात़. 
-रामायण़. 

राजाने मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यावे हे इथे  सांगितले आहे़.  काही  नेत्यांना बोलता चांगले येते़ अशा लोकांचा उपयोग चुकांच्या समर्थनांसाठी केला जातो़.  पक्ष प्रवक्ते म्हणून किंवा चर्चात हिच माणसे भाग घेतलेली आपण पहातो़ ब-याचवेळा त्यांनी तोडलेले तारे हास्यास्पद  असतात़.  ते मंत्रि झालेलेहि दिसतात़. राज्यघटना, कायदा, समाजशास्त्र याच भान ज्यांना नाही त्यांना मत्रिमंडळात स्थान नसावे़. 

-प्रशिप. 

रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

KING 32

३२


स तु श्रेष्ठैर्गुणैर्युक्तः प्रजानां पार्थिवात्मजः ।
बहिश्चर इव प्राणो बभूव गुणतः प्रियः ॥
-रामायण़. 

उत्कृष्ट गुणांनी संपन्न असलेला तो राजकुमार राम आंगच्या गुणामुळे प्रजाजनांना शरीराबाहेर संचार करणारा प्राणच की  काय असा प्रिय झाला़. 
--रामायण़. 

आईला आपला मुलगा आपल्या शरीरा बाहेर असलेला आपला प्राण आहे असे वाटणे स्वाभाविक आहे़.  या पेक्षा अधिक  घट्‌ट नाते असू शकत नाही़.  असे नाते प्रजाजनांना राजपुत्र रामाबद्दल वाटावे ही राजा आणि प्रजा यातील परमोच्च अवस्था आहे़ म्हणूनच आदर्श राज्याला रामराज्याचा दर्जा प्राप्त होतो़. राजाच्या मुलाचा वर्तनाचा दाखला जनतेने दिला पाहिजे. राजाने देता कामा नये. 

-प्रशिप

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

KING 31

३१

सक्तं ग्राम्येषु भोगेषु कामवृत्तं महीपतिम्‌ ।
लुब्धं न बहु मन्यन्ते श्मशानाग्निमिव प्रजाः ॥
-रामायण़. 

जो राजा लोभी, ग्राम्य विषयांचे ठिकाणी आसक्त होणारा आणि मनास येइल तसे वर्तन करणारा असतो, त्याचा स्मशानातील अग्नीप्रमाणे  लोक तिरस्कार करतात़. 
-रामायण़. 

लोभ आणि काम आसक्ती या दोन गोष्टींच्या आहारी गेलेली व्यक्ती नाश पावते़ कारण त्यासाठी ती व्यक्ती काहीही करायला तयार असते, त्यातून प्रमादच घडतात़ हिच बाब राजाचे बाबतीत घडली तर त्याचेसह राष्ट्र नाश पावते़ अशा राजाचा तिरस्कार  झाला नाही तरच नवल़.  जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत़. चारित्र्य संपन्न राजा हेच राज्याचे वैभव असते. 

--प्रशिप

शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

KING 30

३०


राजैव कर्ता भूतानां राजा चैव विनायक: ।
राजा सुप्तेषु जागर्ति राजा पालयति प्रजाः ॥
-रामायण़. 

राजाच सर्व लोकांचा कर्ता असून, त्यांचा मुख्य नायकही तोच आहे़ सर्व लोक निजले असता राजा जागतो, आणि त्यांचे पालन कंरतो़
-रामायण़. 

शत्रूंसाठी, चोरांसाठी रात्रीची वेळ अधिक उपयोगाची असते़.  सर्वाधिक भीती रात्रीच असते़ निर्भयपणे झोपता यावे म्हणून  रात्रीची गस्त, रस्त्यावरील प्रकाशदिवे, पोलीसनाके, अनोळखी  वा संशयास्पद व्यक्तीची चौकशी इ़. बाबी ह्या राजयंत्रनेचाच भाग आहे़त. म्हणजे जनता झोपली असता राजा जागरुकंपणे आपले पालन करीतच असतो़ ही यंत्रणा ढेपाळली तर राजा झोपला असे समजावे़. 

-प्रशिप. 

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०१४

KING 29

२९

राजदोषैर्विपद्यन्ते प्रजा ह्यविधिपालिताः ।
असद्वृत्ते हि नृपतावकाले म्रियते जनः ॥
--रामायण़

राजाने योग्य रीतीने प्रजेचे पालन केले  नाही, तर त्या राजाच्या दोषामुळे प्रजेवर संकटे कोसळतात़ राजा दुर्वतन करणारा निघाल्यास लोक अकाली मरतात़
--रामायण़. 

कर्तव्य न करणे हे दुर्वतनच आहे़ पण त्यमुळे लोक अकाली कसे मरतातअकाली मरणाची कारणे बहुदा युद्ध,नैसर्गिक आपत्ती,रोगराइ,अपघात, भीती इ़. असतात़.  युद्ध करण्याची हिम्मत शत्रूला होउ नये अशी सैनिकी  तयारी असावी़ दुष्काळा  सारख्या नैसर्गिक आपत्तिचा व रोगराइचा सामना करण्याची पूर्व तयारी हवी, अपघातावर नियंत्रनासाठी आधकाधिकं योजना हव्यात, आणि मग निर्भयतेने जगता येण्याची खात्री देणा-या राजाच्या देशात अकाली मरण येणार नाही़
--प्रशिप. 

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

KING 28

२८


क्षममाणं नृपं नित्यं नीचः परिभवेज्जनः ।
हस्तियन्ता गजस्येव शिर एवारुरुक्षति ॥
-महाभारत़

राजा सदैव अपराधाची क्षमा मागू लागला, म्हणजे निकृष्ट प्रतीचे लोकसुद्धा  त्याची अवज्ञा करु लागतात़. हत्तीच्या मस्तकावर आरोहण करणा-या माहूताप्रमाणे ते त्याच्या डोक्यावर बसण्याची इच्छा करु लागतात. 
--महाभारत़

राजा ज्ञानी आणि तत्ववेत्ता असावा तो याच साठी़ राजा कडून खरे म्हणजे चूकाच होउ नयेत़ म्हणजे त्याला क्षमा मागायची वेळ येता कामा नये़ लोकप्रतिनिधी निवडतांना नेहमी चूका  करुन क्षमा मागणारा निवडता कामा नये़ अन्यथा ती आपली चूक ठरेल आणि ह्या चुकांना  क्षमा नाही़. 
  -प्रशिप.