मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४

KING 34

३४


परस्य वीर्यं स्वबलं च बुद्ध्‌वा
स्थानं क्षयं चैव तथेव वृद्धिम्‌ ।
तथा स्वपेक्षेजप्यनुमृश्य बुद्ध्‌या
वदेत्क्षमं स्वामिहितं स मन्त्री ॥
                                  -रामायण़

जो पुरुष शत्रूचे आणि आपले बल जाणतो, शत्रूच्या आणि आपल्या सैन्याची स्थिति, वृद्धि आणि क्षय ह्यांचा बुद्धिपूर्वक विचार करतो, धन्याचे हित कशात आहे ते योग्य रीतीने त्याला सांगतो, तोच खरा मंत्री होय़. 
--रामायण़

मंत्रिमंडळातून फुटून आपला गट किंवा सत्ता स्थापण्याचे अनेक प्रसंग आपण पाहिले आहेत़.  आपल्या प्रमुखाला केवळ सत्य सांगण्याचे धाडस किंती मंत्र्यांमधे असलेले आपण अनुभवले आहे मला झाडू मारायला सांगितला तरी मी मारीन असे म्हटलेलेहि आपण पाहतो.  धन्याचे हित म्हणजे राष्ट्राचे हित असावे़. राजाचे मन्त्री होयबा नसावेत.  

-प्रशिप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा